नागपूर ब्यूरो : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’ संघटनेचे नेते रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरले आहेत. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध केला.
मंगळवार, (1 डिसें.) सकाळी 8.00 वा. नागपूरातील बेसा चौकात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व केंद्र सरकार विरोधात यावेळी रोष व्यक्त केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने ताबडतोब दखल घेवून तोडगा काढावा, महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पूर्ण ताकदीने सोबत आहे यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
अन्यथा भडका उडेल – रविकांत तुपकर
शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी लाखों शेतकरी दिल्लीत 6 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. पंरतु केंद्र सरकार मस्तीमध्ये आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. केंद्र सरकारने 3 दिवसात तोडगा न काढल्यास संबंध देशातील शेतकरी तर रस्त्यावर उतरतीलच. पण महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडवू. असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).