Home Maharashtra राहुल भालचंद्र पांडे, सुरेशचंद्र गैरोला आणि समीर सहाय यांची राज्य माहिती आयुक्त पदी...

राहुल भालचंद्र पांडे, सुरेशचंद्र गैरोला आणि समीर सहाय यांची राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती

578

मुंबई ब्युरो : माहिती आयोगात  राज्य माहिती आयुक्त म्हणून  राहुल भालचंद्र पांडे, सुरेशचंद्र गैरोला आणि समीर  सहाय या तिघांची नेमणूक करण्याची अधिसूचना  काढण्यात आली. या तिघांच्या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मान्यता दिली असून राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना १६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली.

राहुल भालचंद्र पांडे यांचा परिचय
राहुल भालचंद्र पांडे

मध्य भारतातील सर्वात मोठे इंग्रजी वृत्तपत्र द हितवादचे शहर संपादक राहुल पांडे ह्यांचे माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विदर्भातील माहिती आयुक्त म्हणून निवड झालेले पांडे हे पहिलेच पत्रकार. 48 वर्षीय पांडे ह्यांनी पोलिटिकल सायन्समध्ये एम ए केले असून त्यांनी एलएलबी ही पूर्ण केले आहे.

पांडे ह्यांचा पत्रकार म्हणून ही आरटीआय कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी असंख्य आरटीआयवर आधारित बातम्या तर केल्या आहेतच, पण तसेच आरटीआयचा योग्य वापर करून ही असंख्य प्रकरणं उघडकीस आणली आहेत. सार्वजनिक हिताच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी केलेल्या वार्तांकनामुळे हाय कोर्टाने त्या विषयांना जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोर्टाने वार्तांकनाची दखल घेतलेला राहुल पांडे हा एकमेव पत्रकार असेल.

त्यांच्या राजकीय अभ्यास आणि आकलनामुळे अनेक वेळा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्सवर ही चर्चा सत्रांमध्ये त्यांना बोलावले जाते. त्यांनी नुकतेच नितीन गडकरी ह्यांच्या वेबिनार वर आधारित “अनमासकिंग इंडिया” नावाचे पुस्तक ही संपादित केले आहे.