नागपूर ब्यूरो : विचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य (मा. गो. वैद्य) यांचे आज (शनिवार) दुपारी 3.30 वाजता नागपूर येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.

मा. गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार सकाळी 9.30 वाजता त्यांचे विद्याविहार प्रतापनगर येथील निवासस्थान येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील, असे कुटुंबीयांच्यावतीने ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’ ला सांगण्यात आले आहे.

मा. गो. वैद्य यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).